December 7, 2014

कायरे गांव - ता. पेठ, जिल्हा - नासिक 

अनेक वर्षापूर्वी अनेकदा आदिवासी पाडयावर जाण्याचा योग येत असे. ज्या आदिवासी पाड्यांवर जाणे झाले तेंव्हा मनात येणाऱ्या भावना आणि काल कायरे गावात भेटीच्या वेळी आलेल्या भावना यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. आपले खूप काही हरवलंय, कायरे गावात ते काहीतरी गवसले, आपण असंबद्ध भटकतोय, आता दिशा मिळाली, आपण खूप बडबड केली ज्याला आगा-पिच्छा काही नव्हता, त्या चर्चेला आता मूर्त स्वरूप मिळू शकेल असं वाटायला लागलं.... 
मी माझ्या डोक्यात काय आहे ते मांडतोय.. 
पहिल्यांदा निरीक्षणे, विश्लेषण तदनंतर माझी मते... 

1. गावाचे वातावरण - श्यामलाने सांगितले की तिला ह्या गावात खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. शंभर टक्के सहमत. त्याची कारणे आम्हांला स्पष्ट कळली. सगळे गाव गेल्या दहा वर्षांत अनेक वेळा घुसळलं गेलेय, गावाने खूप भोगलंय एकापेक्षा एक कठिण प्रसंग पण त्या संघर्षाच्या वेळी एका तरुणाने ह्या संघर्षाला एक नैतिक, तात्त्विक आणि वैचारिक अधिष्ठान दिले आणि त्यामुळे श्यामलाला केवळ एका भेटीत जी एनर्जी जाणवली ती आम्हांला जास्त भावली त्यामुळे गावातून निघताना आम्ही एकशे एक टक्के गावकरी झालोच. 

2. ह्या गावात आदर्श होण्याची नक्की क्षमता आहे कारण गेल्या काही वर्षात जे काही तिथे घडलंय त्यामुळे एक पाया तयार झालाय, आपण आपल्या कल्पना तिथे प्रत्यक्षात आणू शकतो. 

3. नेतृत्त्व - गावाला आज हेवा वाटावे असे नेतृत्त्व मिळालेय, 27 वर्षांचा सुशिक्षित, वैचारिक स्पष्ट, विचार-कृती-विचार यांचा संगम आणि कृतीवर जास्त भर देणारा, समाज-राजकारण यांची भान व सजगता, शासकीय योजनांची माहिती व त्या राबवण्यासाठी करावे लागणारी मेहनत व त्याच बरोबर जागेपणी स्वप्न पाहून सर्वांना बरोबर घेऊन नविन तरुणांना तयार करणारा तरूण सरपंच.... मला वाटते की त्याच्या मुळे त्याचे स्वप्न आमचे झाले. शनिवारी रात्री आम्हांला झोप लागली नाही हे त्यामुळेच... आदिवासी गावाला असे नेतृत्त्व लाभणे, अशा गावाशी आपला संपर्क होणे हा प्रचंड चांगला आणि पॉझिटिव्ह योगायोग आहे. आणि आपण इथे काही कृती केली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. 

4. गावकऱ्यांची मानसिकता - सामाजिक संघर्ष तर सर्वांच्या पाचवीला पूजलेला आहे, आदिवासी समाजाच्या बाबतीत तर कदाचित जास्तच. या गावाने अलीकडच्या काळात केलेल्या संघर्षातून गावकरी मनाने एकत्र आलेत व सक्षम नेतृत्त्वामुळे विचाराने देखील. आपल्या स्थितीला आपणच जबाबदार आहोत आणि आपण एकत्र राह्यलो तर आपल्या परिस्थितीत चांगला बदल होईल अशी जाणीव बोलून दाखवणारे गावकरी 

5. गावाचे व लोकांचे प्रश्न - तिन गावांचे प्रश्न वेगवेगळे पण आपल्या राजकीय प्रगतिचे वास्तव ठळकपणे पुढे आणणारे, प्रगत महाराष्ट्राची लाज काढणारे. गावात तारा आहेत पण वीज कुठे ? शेतीचे सोडा पिण्याच्या पाण्यासाठी 8 महीने काय करावे ही चिंता. शेती पावसाच्या भरवश्यावर पण हे चार महीने सोडल्यास 8 महीने रोजगार नाहीच. मग आठ महीने गाव सोडून रोजगारासाठी भटकंती. गाव तिथे एस.टी. आणि प्रत्येक गावात आरोग्य सुविधा असे आपण ऐकले पण इथल्या एका गावात आजारी माणसाला 4 किमी अंतरावर चादरीचा झोळ करूनच कोणाची गाड़ी असेल तर 20 किमी वरच्या इस्पितळात घेऊन जाता येते. 100 टक्के प्रसूती घरीच. एका गावात जमीन आहे पण पाणी नाही तर दुसऱ्या गावात पाणी आहे पण जमीन नाही, दोन्ही गावे एकाच ग्रुप ग्रामपंचायतीत पण एक गाव पायथ्याला तर दूसरे डोंगर माथ्याला. शाळा प्राथमिक, शिकायचे तर 15 किमी वरील आश्रम शाळेत चालत जा. 

6. राजकारणाचा हस्तक्षेप - पाडा किंवा आदिवासी गाव म्हणून असेल गावात आदिवासी वगळता अन्य समाजाचे लोक नाहीत, सगळी घरे आदिवासींचींच. त्यामुळे आजतरी राजकारणाचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे तर आपल्याला काम करण्यासाठी मशागत योग्य पण एकूणच प्रश्नांचे स्वरूप व आव्हाने कठीण 

थोड़े सरपंचाविषयी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कौटुंबिक पाठबळ नसताना पुस्तके वाचता वाचता एखाद्या तरूणाचा नेता, चांगल्या अर्थाने, होताना हयाने कसा संघर्ष केला हे त्याच्याच तोडून ऐकण्याचे आमचे भाग्य. बी.एस.सी. नंतर बी.ए. आणि एम्.ए. भरपूर वाचन, समोर घडणाऱ्या घटना त्यावेळी योग्य वैचारिक हस्तक्षेप करण्याची पात्रता आणि ढिटाई, योग्य आणि अयोग्य किंवा न्याय अन्याय शास्त्रीय युक्तिवादाने समोरच्याला निरुत्तर करण्याची क्षमता, या वैचारिक बैठकिला कृतीची जोड़, विचार करून अभ्यासाच्या जोरावर ठामपणे भूमिका घेण्याचे धैर्य यातून एखादा आंबेडकर जन्माला येतो. ते सर्व आम्हाला जाणवले पुंडलिक मध्ये. शासकीय योजनांची माहिती व् राबविणाऱ्या यंत्रणेचे भान त्याला आहे, त्याला आपल्या मदतीची गरज आहे का ? हा आम्हाला पडलेला प्रश्न. 

आता गावाने केलेल्या संघर्षा विषयी थोडक्यात ... 
गाव तसे साधे, आदिवासी परंपरा पाळणारे, पावसावर आधारीत शेती चार महिने बाकीच्या काळात शहरात स्थलांतर, शिक्षण आरोग्य सगळे होईल तसे, होईल तेंव्हा. जे होईल ते सोसत जायचं, जगत जायचं... गावाचा गाडा चाललाय जसा चालेल तसा... बाकी गावात आदिवासी परंपरेने वेठ-बिगार, इथे शेती करणारे हाच काय तो फरक ! अशा गावात नेहमीची भांडणं, नेहमीचे हेवे दावे... 

पण याच गावात गावातल्या दोन कुटुंबाकडे थोडी जास्त ताकद, दादागिरी म्हणून हक्काचा मानपान. सणा सुदिला देवाच्या आधी त्यांचा मान, त्यांची पूजा. कोणत्याही वादामध्ये ते म्हणतील ती पूर्व दिशा, त्यांच्या विरोधात जाणारे आयुष्यातून उठतील एव्हढी दहशत. त्यांचं ऐकले नाही तर त्या माणसाला वाळीत टाकणार, रोटी बेटी व्यवहार बंद. अन्धश्रद्धांचा पगडा जबरदस्त, या दादागिरीच्या विरोधात गेलेल्या माणसाला कपट कारस्थान करून भूत ठरविले गेले (तो म्हणे ज्या शेताकडे बघे, ते उभं शेत जळून जाई), सगळ्या गावाला भगता मार्फत हे सिद्ध करून झाडाला बांधून दगडाने ठेचून त्याच्या बायका-मुलासमोर मारले गेले, हे प्रकरण देशभरात गाजले, या प्रकरणात शिक्षा झाली सामान्य गावक-यांना, हे दादा मात्र नाममात्र ! जंगलात लाकूडतोड करायला गावक-यांना जबरदस्ती पाठविले जायचे. का तर खटले चालवायला पैसा उभा करायला, लाकूड विकून आलेला पैसा मात्र यांच्या खिशात पुन्हा लाकूड चोरी मध्ये पोलिसांकडून पकडला जाणार निष्पाप गावकरी, नको ते सण साजरे करायला पैसा गोळा व्हायचा खंडणी सारखा, ज्याचा हिशोब कधी मिळायचा नाही. 

वेळोवेळी हे चुकीचे होतंय, हे पुंडलिक दाखवून द्यायचा. असेच एक प्रकरण चिघळले, पोलिसाकडे गेले. गावात एक चर्च आहे, १६ ख्रिश्चन परिवार आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गावक-यांना भडकविण्यात आले, चर्च पाडले गेले, खूप हिंसाचार झाला, पुन्हा अडकले गावकरी आणि करणारे, फितवणारे नामानिराळे. या प्रकरणात आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही, तेंव्हा चर्चला विरोध न करण्याची भूमिका घेतल्याने पुंडलिक वर ह्या दादा लोकांनी बहिष्कार टाकला, त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले. गावक-यांना कळत होते कि अन्याय होतोय, प्रत्येक वेळी आपणच अडकतोय, हे कळायचे पण विरोध करायला कुणी धजावयाचे नाही 

अशात एका प्रसंगात एका वाडीतल्या बायकांनी या दादा लोकांची पूजा केली नाही म्हणून बहिष्कार, जोर-जबरदस्ती आणि किल्ला लढविला बहिष्कृत पुंडलिकने, आणि ते प्रकरण धसास लाऊन या दादा लोकांना गावक-यांनी जागा दाखवून दिली. आणि पुंडलिक सरपंच झाला, त्याने गेल्या साडे-तीन वर्षात अनेक सरकारी योजना गावात आणल्या, पाण्यासाठी पाझर तलाव केले... गावात एकजूट झाली... 

पुढे काय ? सरपंच पुंडलिक ने स्वप्न पाहिलंय आदर्श गावाचे... त्याने त्याप्रमाणे वाटचाल केलीय गेली तीन वर्षे... गावाची मानसिकता घडवलेय त्याने... त्याच्या म्हणण्यांनुसार तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांनी सांगितले तर गावकरी ऐकतील, रीस्पोंस देतील... काही प्रश्न गंभीर आहेत, सरकार दफ्तरी खूप पाठ-पुरावा करावा लागतो, पाठ-पुरावा करूनही निधी, राजकारणा मुळे कामं अडकतात... काही नवीन गोष्टी तुमच्या माध्यमातून येण्यातून प्रगतीला हातभार लागू शकतो... साथ-साथ चालण्याने कल्पना सुचू लागतील, विचारांची देवाण-घेवाण होईल.... मार्ग नक्की सापडलाय, पुंडलिक त्या मार्गावरून गावाला पुढे घेऊन जाईल, पण आपल्या मदतीने मार्ग-क्रमण सुलभ होईल... एव्हढं नक्की... 

गावात शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, पाण्याच्या प्रश्नावर, वीज-पुरवठा, रोजगाराच्या बाबतीत आपण काही एक काम नक्की करू शकू... सरकारी योजनाच्या अंमलबजावणी च्या वेळी आपली भूमिका राहील. शहरातील काही संस्थाच्या मदतीने काही उपक्रम राबविले जाण्यासाठी आपली भूमिका असू शकते... CSR च्या माध्यमातून काही निधी गावाकडे वळवू शकतो. गावातील रस्ते, संडास व स्वच्छता या आघाडीवर NSS वा कॉलेज विद्यार्थी जोडले जाऊ शकतात... 

बरंच काही करता येऊ शकते, जबाबदारी घेतली तर... पण आपल्याला जे वाटते तेच करता येईल असे नाही, तिथली गरज काय त्यावर कामाची बांधणी होऊ शकेल, त्यासाठी संपर्क वाढवावा लागेल, कामाला सुरुवात करावी लागेल.

June 15, 2011

Eliyahu Goldratt : Guru of ToC (Theory of Constraints) , Critical Chain left for heavenly abode.......feel very sorry to learn about the death of Dr Goldratt. CLICK HERE to learn tribute to him.
Tribute to Eliyahu Goldratt - Ricardo Viana Vargas


January 13, 2011

As a change-initiative, I do help social organisations build their websites, free of cost of course ! You can get a glimpse of such websites built by me.

My Mission : Free Websites for NGOs / Social Organisations ….

If you are working for some NGO / Social Organisation, this message is for you….If you do want to create home-page / web-site for your organisation but you do not have budget, you do not have expertise, you do not know how to go about, I can help you.

Contact me if you want to reach more & more people … It is simple, cost-effective and you need not worry to update the content on your web-site. I will train you and you will be able to operate it on your own after 4-hrs training. You will update the photos, notices, programme-invitations, programme-reports etc etc on your own. No need to depend on some external agency to update your site. Your site can store a lot of data including your photos, presentations & other files and people or your members can use it, upload it or see it.

Yes ! your site can be interactive with anybody becoming member and participating in discussions, forums or members even can upload content...anything, any functionality you want can be added in these sites.

Click on the following links to see how some organisations are maintaining after 4-hrs training….

Pratibimb Marriage Bureau : made in php language with real-time database, chat facility

Dnyan-Prabhat Pratishtan : Website made in Joomla, maintained by Samir manchekar …

Rajiv Tambe Dot Com : Website made in WordPress, maintained by Rajiv on his own …

No Nuke Konkan : Website for awareness against Jaitapur Nuclear Project, in WordPress …

Nisarg Picnic : My first website, made in traditional html format ….

My Personal Blog : My blog “My Expressions My Thoughts, in Blogger ….

My personal website : made in wordpress with free templates available online…

My business Website : Clean Joomla template with flash header …

Community Website : Joomla website for community of fabrication-welding professionals…

Under Construction Site : Joomla website with a professional template & a lot of options

Sugava Parivar : Blog throwing light on intercaste movement by Sugava/ AppaRedij …

Intercaste Marriage Blog : made in blogger platform with free templates available online…

How it works :
  • You are requested to visit the above links & see my work / capabilities & decide if you want my services.
  • Call me on 09820236581 and share your plans. There are three different platforms “Joomla”, “WordPress” & “Blogger” to choose from.
  • Refer to me some sample sites you liked and you wish your website should look like.
  • Send me details, programmes, reports, photos (Samples) of your organisations which should appear on this site.
  • I will make some designs for you to choose from. Select the design & inform me.
  • I will complete the basic design & all the functions you will need to display your information. We will buy domain name for your organisation like www.myorganisation.com
  • Then, I will train you for 4-5 hours so that you can start updating the content, adding new content.
  • Within 2 weeks, the website should take its final shape & then onwards, you are the owner of your site.
  • I will provide free e-mail support in case you need help, advice in future.
  • Once you decide, in 2-3 weeks your website will be available on line for whole world to visit.
Call me on +91-9820236581 or send me email on ubagwe@gmail.com

April 30, 2010

Chandamama : Indian childrens magazine with stories on mythology, culture & tradition. लहानपणी चांदोबा तील सुरेख गोष्टी वाचत आम्ही मोठे झालो, त्या चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक इथे उपलब्ध आहेत, ग्रेट !

March 2, 2010

अनिल बोकील यांचे अर्थक्रांती वरील विचार वाचनात आले, पटले...सगळ्यापर्यंत हा विचार पोहचला पाहीजे. माझ्या मते, प्रचंड लोकसंख्येमुळे भारताची प्रगती होत नाही हा मुद्दा मला पटत नाही, खरं तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढविणा-या काळा पैसा आणि भ्रष्टाचार ह्या दोन प्रवृत्तींमुळे देश प्रगत होत नाही....

अनिल बोकील यांच्या अर्थक्रांती वरील विचार स्पष्ट करणारा हा लेख ...

" आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं कोणाला वाटत नाही, पण आपल्या खिशात पन्नास रुपयापेक्षा जास्त मोठी नोट असणे, हाच ’इकॉनॉमिकल’ लोचा आहे, या मोठ्या नोटांमुळेच बेकारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई आणि आर्थिक मंदी बोकाळलीय, हे सारे टाळण्यासाठी देशातील पन्नासच्या वरील सर्व नोटा बंद करा...."

असे सांगत गेली काही वर्षं औरंगाबादचा एक अर्थतज्ज्ञ देशभर हिंडतोय. आपले हे ' अर्थक्रांती ' चे स्वप्न साकारण्यासाठी तो आपली ही थेअरी लेख, पुस्तके, टीवी, इंटरनेटच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्याची ही थेअरी पाहून थेट पंतप्रधान, राष्ट्रपतीही चाट पडलेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी तर, ' जेव्हा मी या विधेयकावर सही करेन तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल ' असे सांगितलेय.... त्या क्रांतिवेड्या अर्थतज्ज्ञाचे नाव आहे... अनिल बोकील .


अर्थशास्त्र म्हणजे काहीतरी किचकट, अगम्य असं समजून आपण कायमच त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अनिल बोकील तो अधिकाधिक सोपा करून आपल्याला सांगण्याचा आटापिटा करताहेत. कारण पैसा हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा आणि आवडता भाग आहे. पण त्यामागचे अवघड गणित समजून घ्यायची आपली तयारी नसते. म्हणूनच त्यातला अवघडपणा काढला तर ते अधिक पारदर्शी होईल, असा बोकील यांना विश्वास आहे.

आपल्याकडे पन्नासाहून मोठी नोट नको, असे बोकील पुन्हापुन्हा सांगतात. आपले हे म्हणणे पटवून देण्यासाठी ते एक सोपे उदाहरण देतात. ते म्हणतात, अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न ४० हजार डॉलर आहे आणि त्यांची सर्वात मोठी नोट १०० डॉलर आहे. म्हणजेच त्यांच्या दरडोई उत्पन्नाचे मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे ४०० पट आहे. तसेच ब्रिटन आणि जपानचेही पौंड आणि येनशी असेलेले प्रमाण हेदेखील ४०० पटीचे आहे. पण भारताचे दरडोई उत्पन्न २३ हजार आणि सर्वात मोठी नोट १००० रुपयाची आहे. म्हणजे हे प्रमाण फक्त २३ एवढे आहे. कशासाठी ?

या कमी प्रमाणामुळेच देशात काळ्या पैशाची निर्मिती होते. आपल्याकडील व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. लोक बॅकेच्या माध्यमातून व्यवहार करण्याऐवजी रोखीच्या माध्यमातून व्यवहार करतात. त्यामुळे या व्यवहारांची नोंद राहत नाही आणि काळा पैशावर आधारित भ्रष्ट अर्थव्यवस्था जन्माला येते. बोकील यांच्या मते आज आपल्या देशातील ८० टक्के व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. तेच प्रगत देशात ९० टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमातून होताना आढळतात.

या रोखीच्या व्यवहारामुळेच काय घडू शकते, याचे उदाहरण द्यायचे तर भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचे देता येईल. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. त्याच्यापोठापाठ १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवरही हल्ला झाला. अमेरिकेला अल-कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले. पण भारतात मात्र संसदेवर हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्क उद्ध्वस्त करता आले नाही. याचे कारण अमेरिकेने अल-कायदाची सारी अकाउंट्स सीझ केली. त्यामुळे अल्-कायदाची पैसा हीच ताकद संपल्याने नेटवर्क उद्ध्वस्त करता आली. पण भारतात बहुतांशी व्यवहार रोखीच्या माध्यमातून होत असल्याने अशी अकाउंट्स सीझ करण्याचा काहीच फायदा झाला नाही.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांनी १४ जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द केल्या. याचे कारण अमेरिकेत प्रचंड काळा पैसा वाढला होता. तसेच भारतातही आज या समांतर काळ्या इकॉनॉमीने हातपाय पसरले आहेत. ती संपवण्यासाठी पन्नास रुपयांच्या वरची नोट बंद करणे हेच हिताचे ठरेल.

भारतात रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी असणा-यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत. मात्र रिझर्व बँकेच्या अहवालानुसार १०० रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचे प्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजार रुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६ कोटी इतक्‍या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थ रोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देते आहे. हे फक्त या मोठ्या नोटा रद्द झाल्या तरच टाळता येणे शक्य आहे.
हे जसे झाले नोटांचे, तसाच एक लोच्या आपल्या करप्रणालीचा आहे. मुळातच टॅक्स चुकवणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे डायरेक्ट टॅक्सपेक्षाही इन्डायरेक्ट टॅक्स वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एक सामान्य भारतीय जवळपास ३०-३२ प्रकारचे टॅक्स भरत असतो.. तेही त्याच्या नकळत. म्हणजे जेव्हा आपण एखादा साबण घेतो तेव्हा त्याचे ४-५ रुपये आपण सरकारला विविध करांच्या रुपाने देत असतो.

खरं तर एकंदरीतच भारतीय करप्रणाली कमालीची गुंतागुंतीची आणि दुर्बोध आहे. एखाद्या चार्टर्ड अकांउटलाही ती सहजसोपी करून सांगणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे तर एका टीव्हीची किंमत मुंबईत ५००० हजार असेल तर पनवेलमध्ये ती ५५०० असू शकेल. कारण त्यात जकात लागू होते. तसेच जर तुम्ही तो मध्य प्रदेशात घ्याल तर तो तुम्हाला कदाचित ४५०० रुपयांना मिळू शकेल, कारण तेथील सेल्स टॅक्स स्ट्रक्चर वेगळे आहे. त्यामुळे एकच वस्तू देशाच्या विविध भागात विविध किमतींना उपलब्ध होते. त्यामुळेच काळाबाजार तेजीत येतो. त्याहूनही डोकेदुखीची बाब म्हणजे, आपल्याच रुपयाची किंमत आपल्याच देशात विविध ठिकाणी वेगळी ठरते.

या गुंत्यामुळे लोक जकात चुकवून काळ्या बाजाराने व्यापार करतात. बिलं न घेता वस्तू खरेदी करतात. या समांतर आणि काळ्या अर्थव्यवस्थेमुळे देशाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळेच ही करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तर टॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. कारण असा अवाढव्य टॅक्स कमी झाला आणि तर तो भरून ' गॅरेंटेड ' माल घेणे कोणीही पसंत करेल.
यासाठी बोकील एक साधीसोपी करप्रणाली सुचवतात. दोन देशांमध्ये असलेली इम्पोर्ट ड्युटी वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे टॅक्स रद्द करावेत. त्याऐवजी सरकारने बॅंकेतून होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) ट्रॅन्झॅक्शन टॅक्स लागू करावा. हा टॅक्स थेट बॅंकेतूनच वजा होणार असल्याने दरवर्षी शेवटी टॅक्स भरण्यासाठी होणारा आटापिटाही बंद होईल. गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर आकारला जाणार नाही.

म्हणजेच समजा मी तुम्हाला चेकद्वारे १०० रुपये दिले. तर माझ्या अकाउंटमधून १०० रुपये वजा होतील पण तुमच्या अकांउटला मात्र ९८ रुपयेच जमा होतील. त्या दोन रुपयांपैकी ७० पैसे केंद्र सरकारला, ६० पैसे राज्य सरकारला, ३५पैसे महानगरपालिकेसारख्या स्थानिक संस्थेला आणि उरलेले ३५ पैसे बँकेला महसुलाच्या स्वरूपात मिळतील. यामुळे सरकारला आपल्या कामासाठी सतत महसूल उपलब्ध होत राहील आणि जनतेचीही टॅक्सच्या जंजाळातून सुटका होईल.

या पद्धतीतून अनेक गोष्ट साध्य होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इन्डायरेक्ट टॅक्स संपल्यामुळे वस्तूंच्या किंमती कमी होतील. आपण आज जे चायनाच्या स्वस्त मार्केटचा बाऊ करतो, तो करण्याची वेळच येणार नाही. तसेच समानतेचे सूत्र पाळले जाईल. देशातील सर्व ठिकाणी एका वस्तूची किंमत समान राहील आणि त्यामुळे रुपयाचीही किंमत समान राहील.

या करप्रणालीसोबतच बोकील म्हणतात की, २००० रुपयांवरील रोख व्यवहार बेकायदा ठरवावावेत. जेणेकरून बँकमनी वाढेल आणि बाजारात फक्त पैसा नाही तर भांडवलही वाढेल. कारण आपल्याकडे पैसा खूप आहे भांडवल नाही. आपल्याकडे असलेला पैसा हा योग्य हातात योग्य वेळी पडण्यासाठी असलेली यंत्रणाच कमकुवत ठरते आहे. त्यासाठीच आपल्या देशाला या अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही.

अनिल बोकील ज्याला अर्थक्रांती म्हणतात , ती थोडक्‍यात अशी आहे

१) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढून टाकावेत.

२) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बँकेतून होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागू करणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते , त्यांच्याकडून हा कर बॅंकेतूनच कापून घेतला जाईल.

३) या मार्गाने जमा होणा-या कराचे वाटप केंद्र , राज्य , पालिका-महापालिका असे निश्‍चित करून ती रक्कम त्या सरकारच्या नावावर जमा होईल.

४) रोखीच्या व्यवहारांवर मर्यादा आणण्यासाठी पन्नास रुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात येतील.

५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोख व्यवहारास सरकारी मान्यता मिळेल. त्यापुढील रोखीचे व्यवहार बेकायदा मानले जातील.

६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न नसेल.

या पद्धतीमुळे आता असलेला काळा पैसाही मुख्य प्रवाहात येईल. एकंदरीतच अर्थव्यवस्था शुद्धिकरणाची प्रक्रिया यातून साध्य होईल. कारण आज निवडणुकीपासून सर्व व्यवहार काळ्यापैशावर आधारीत आहे . हे राजकारणी काळ्या पैशाची निर्मिती करत नाही पण त्याचा वापर करतात . सामान्य जनताही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असते. ते रोखण्यासाठी २००० रुपयांवरील प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणारी हा पद्धत ' जादुई ' ठरू शकेल.

अनिल बोकील मांडत असलेली ही थेअरी या देशात क्रांती घडवायला सज्ज आहे. पण कोणताच बदल लगेच न स्वीकरणा-या या देशाला उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, याचे पूर्ण भान बोकीलांना आहे. त्यांना जेव्हा विचारले जाते, की तुमची ही पद्धत क्रांतिकारी आहे, तर तातडीने स्वीकारली का जात नाही ? तर ते एक गोष्ट सांगतात...
आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावर मजले आहेत. तळातल्या मजल्यावर सामान्य माणूस आहे, त्यावर श्रीमंत, उद्योगपती आहेत आणि सर्वात शेवटच्या माळ्यावर कायदा करणारे राजकारणी आहेत. पण या जहाजाला खालून भोक पडलंय... कुणी कुठेही असला तरी जहाज बुडणार आहे. त्यामुळे खालचे मेले तरी वरच्यांनाही मरावेच लागेल. त्यामुळे भोक बुजवण्यासाठी राजकारण्यांनाही झुकावेच लागेल. फक्त प्रश्न केव्हा याचाच आहे ?

बोकीलांचा हा आशावादच आपल्याला उभारी देणार आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळं निघाल्याची बोंब मारत जागतिक मंदी आली असली.. तरी पुढे फक्त अंधारच नाही.. तर अर्थक्रांतीचे आशेचे किरणही आहेत....

January 24, 2010

आज २५ जानेवारी, आप्पा उर्फ रघुनाथ रेडीज यांची आज दुसरी पुण्यतिथी !

आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत "आंतरजातीय लग्न" या एका ध्येयाशी अविचल राह्यलेली ही व्यक्ती महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत एक अविस्मरणीय युग होय. सामाजिक चळवळीला त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची महाराष्ट्राने जेवढी घ्यावी तेवढी घेतली नाही, ही खेदाची बाब आहे. आज महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह करणा-या दांपत्याला रू.५०००० इतकी रक्कम बक्षिस म्हणून देते, पण पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह व्हावेत म्हंणून जवळपास २५ वर्षे आपल्या निवडक सहका-यांसह तन - मन - धन अर्पून, खिशातील पैसा खर्चून, एखादा वधू-पिता जशा चपला झिजवतो, त्याप्रमाणे आप्पा आमची लग्नं जुळविण्यासाठी तहान भूक विसरून दिवस रात्र एक करीत होते.

माझं आणि माझ्या सारख्या काहीजणांची अशक्य वाटणारी लग्नं त्यांनी जुळविली, हा एक चमत्कारच मानायला हवा, लग्न जुळविण्याबरोबरच सर्वांशी सतत संपर्क ठेवणे, कुटुंबातील विरोध कमी होत दोन कुटुंबाचं मिलन होईल हे पाहणे, मेळावे - स्नेह-संमेलने भरविणे, शक्य तिथे किंवा मिळेल त्या व्यासपीठावर या संकल्पनेचा प्रचार करणे, सामाजिक कार्यकर्त्यांकडून विवाह-अर्ज भरून घेणे, तब्येतीची, उन, पाऊस, वा-यांची पर्वा न करता, मुंबईचा लोकल प्रवास करीत लोकांना भेटत राहणे, सर्वांना पत्र लिहीत राहणे...हे आम्ही पाहत होतो आणि ही चळवळ महाराष्ट्रभरात पोहचेल तेंव्हा त्यांच्या जीवाला शांती लाभेल असं आम्हाला वाटत राही.

ज्यांची आंतरजातीय लग्ने झाली आहेत, असे तरूण-तरूणी, व हा विचार ज्यांना मान्य आहे, असे हितचिंतक यांचा सर्वांचा मिळून अशा मोठ्या परिवाराचे ते कुटुंब प्रमुख होते. हा सुगावा परिवार त्यांनी मोठ्या मेहनतीने घडविला, त्या सुगावा परिवाराने काय काय केले, याची नोंद या निमित्ताने घ्यावी व सगळ्यापर्यंत पोहचवावी, असं माझ्या मनात होते. आज त्यांच्या दुस-या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आणि आमच्या सुगावा परिवाराचा प्रवास जेवढा शक्य होता तेवढा आज आंतरजालावर प्रसिद्ध करायला मला खूप आनंद होत आहे. आज सुगावा परिवाराची माहिती देणारा व आप्पा रेडीज यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा ब्लॉग प्रसिद्ध करायला मला खूप आनंद होत आहे. अजून ब-याच जुन्या गोष्टी, लेख, कार्यक्रमाची माहिती यावर टाकली जाईल, आपल्या सूचना जरूर कळवा. ब्लॉगवर सदस्य व्हा.

January 17, 2010

January 10, 2010

About Me

Unmesh Bagwe, Mechanical Enginner by profession BUT Social Engineer by passion.. always at work..

Having spent 17 years in L&T has given me values & principles & professional approach while a small stint in Europe gave me insights of life, quality & passion...

I have been always associated with social organisations from my college days, starting with apolitical Samata Andolan which shaped up my ideology, from thereon was part of Samajvadi Jan Parishad, an all-India political party which never flourished but made me more mature, A small stint in AAP & then Swaraj India, where I am Jt-Secretary for Maharashtra State today.

At local level, I am secretary of an innovative organisation, Thane Matdata Jagran Abhiyan

Social

Random Posts

About Me

My photo
Thane, India
Project Management Professional, PMP Director, Fabtech CE Pvt Ltd, India Currently in Italy for marketing activities in European Engineering Sector. Politically and Socially active, currently active with small political party "Samajvadi Jan Parishad" and social movement promoting intercaste marriages in India "Pratibimb Mishra Vivah Mandal"

Popular Posts

Text Widget